श्रीमंत होण्याची ५ नियम - चाणक्य नीती || 5 rules for getting rich - Chanakya strategies



(5 Rules For Getting Rich - Chanakya Strategies ) 
माणसाने जास्त प्रामाणिक असू नये कारण सर्वात आधी जंगलातील सरळ झाडेच कापली जातात.असे शक्तिशाली विचार मांडणारे  आचार्य चाणक्य बुद्धिमान व्यक्तींपैकी एक होऊन गेले होते .असे म्हणतात जे चाणक्याचे विचार आपल्या आयुष्यात अमलात आणतात त्यांचे आयुष्य सर्वांगाने सुखी आणि आनंदी होते. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांनी पैशाबद्दल  सांगितलेले पाच नियम सांगणार आहोत. हे तुम्ही केले तर तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही संपूर्ण लेख वाचा.



१. कोणताही काम करण्याआधी त्याचे नियोजन केले पाहिजे. ५ मिनिटे कामाची नियोजन तुमचा एक तास वाचवतो. नियोजनाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजले  असेल . चाणक्य म्हणतात तुमच्या कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला चांगला परिणाम देते. कारण जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची स्पष्टता असते तेव्हा तुम्ही निर्भय असता. तुमचे मन शांत असते.तुम्ही कधी विचार केला आहे  पुढच्या दहा वर्षात वीस वर्षात तुमच्याकडे किती पैसे असतील. तुमच्या मुलांच्या शिक्षणाला किती पैसे लागतील त्याचे नियोजन तुम्ही केला आहे का ? म्हणजे तुम्ही भविष्याचा विचार करून सर्व कामांची नियोजन केले पाहिजे.


२. पैशाचा नेहमी आदर करा, पैशाबद्दल वाईट विचार करू नका, पैसे सर्व दुःखाचे मूळ कारण आहे , पैशामुळे माणूस लोभी होतो असे विचार तुम्हाला पैशांपासून दूर नेतात. वायफळ खर्च करून पैशाची नासाळी करू नका.तरच पैसा तुमच्या हातात राहील.




३. दान धर्म करा. चाणक्य म्हणतात जो आपण देतो ते अनेक पटीने परत येते दान धर्माला विषेच महत्त्व दिले आहे. आजकालचे लोक एवढे स्वार्थी झाले आहे की गरजूंना दान करणे हे आपले कर्तव्य आहे हेच लोक विसरून जातात. अशा लोकांवर लक्ष्मी नाराज होते. व लक्ष्मी आपल्या घरात वास करीत नाही.




४. घर नेहमी स्वच्छ ठेवा. घराचे वातावरण प्रसन्न ठेवा. चाणक्य म्हणतात ज्या घरात नेहमी भांडण होत असतात त्या घरी लक्ष्मी टिकत नाही.त्यामुळे आपले घर स्वच्छ आणि घराचे वातावरण नेहमी प्रसन्न ठेवा.




. मित्रांनो चाणक्य म्हणतात पैसे नेहमी कष्टाने कमवा. जास्त लोभ करू नका आणि पैसे कमविण्यााठी वाईट काम करून पैसे कमवू नका. वाईट मार्गाने कमावलेले पैसे हे नेहमी तुमच्या आयुष्यात नवीन अडचणी आणतात.भलेही तुम्ही वाईट मार्गाने खूप पैसे कमवत असाल परंतू एक ना एक दिवस तेच पैसे तुम्हाला कोणत्याही रुपात परत करावे लागतील. कारण वाईट मार्गाने पैसे कमावणार्याच्या घरात लक्ष्मी जास्त दिवस टिकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या